केदारनाथ -बारा ज्योतीर्लीन्गातील एक तीर्थक्षेत्र. समुद्रसपाटीपासून सुमारे १९,००० किलोमीटर उंचीवर हिमालयात हे शिवालय आहे. सत्य उगामध्ये केदार्नामक राजाने इथे घोर शिवशंकराची तपस्चर्या केली. त्यावरून या क्षेत्राला केदार नाव पडले. केदारनाथला पाच नद्यांचा संगम आहे. मंदाकिनी सरस्वती, शिर्गंगा, स्वर्गाद्वारी आणि महोदधी या पाच नद्यामिळून एक प्रवाह वाहतो तो म्हणजे मंदाकिनी.
इथे प्रचंड बर्फ वृष्टी होत असते. केदार हे छोटेसे गाव बर्फात बुडले जाते. तेथील केदारनाथाचे मंदिर आणि घरे बर्फमय होतात. दिवाळीच्या पाडव्याला केदारनाथाचे मंदिर बंद केले जाते. ते नंतर अक्षयतृतीयेला उघडले जाते. मंदिर सहा महिने बंद असते. तेव्हा तेथील उत्सव मूर्ती उखिमठ येथे नेण्यात येते. केदारनाथाच्या खाली बद्रीनाथाकडे जातांना हे उखिमठ लागते. पांडवांच्या तपस्चर्येने शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी दर्शन दिले. म्हशीच्या पाठीचा भाग केदार येथे जमिनीवर राहिला तेच म्हणजे केदारनाथ स्वयंभू लिंग त्यामुळे हे लिंग म्हशीच्या पाठीसारखे आहे. शिवलिंगाची पूजा केल्याने पांडव पापमुक्त झाले. तेथे मग पांडवांनी मंदिर बांधले. पुढे आद्य शंकराचार्यांनी त्याचा जीर्नोद्दार केला देवळावर सुवर्न् कलश आहे. तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आहे. देवळामध्ये पांडव आणि द्रोपदी यांच्या प्रतिमा आहे. येथे शिवलिंगाला पाण्याने स्नान घालत नाही त्याला तूप चोळण्याची प्रथा आहे. मंदिराच्या भोवती आठ कुंडे आहेत. येथून जवळच भिराव्झाप नावाचा हिमालयाचा कडा आहे. तेथून उडी टाकून देह समर्पण केला. तर आत्महत्येचे पाप लागत नाही असे महात्यंम आहे. स्वर्गारोहण नावाचा इथे एक मार्ग आहे. पांडव याच मार्गाने देह समाप्तीच्या वेळी गेले. स्वर्ग्रोहण येथे कुंड असून ते तीर्थ आहे.
No comments:
Post a Comment