Showing posts with label तिरुपती-बालाजी. Show all posts
Showing posts with label तिरुपती-बालाजी. Show all posts

Thursday, 28 April 2011

तिरुपती-बालाजी


तिरुपती-बालाजी- हे स्थान आंध्रमधील रेनीगुंडा स्टेशनपासून जवळ आहे. तसेच मद्रासपासून रेनीगुंडा  स्टेशन १३६ कि. मी. आहे. हे स्थान शेषाचल पर्वतावर असून, या पर्वताला एकूण सात शिखरे आहेत. याला सात फण्यांचा अदिशेष समजतात. ज्या पर्वतावर व्यंक्तेशाचे मंदिर आहे त्याला वेन्क्ताचल म्हणतात. तिरू म्हणजे श्रीमान, मलै म्हणजे पर्वत किंवा श्रीपर्वत म्हणतात. दुसरा अर्थ वेंडू म्हणजे  पाप, कट म्हणजे नाशक, अर्थात पापनाशक पर्वत असे म्हणतात. तसेच गिरीचा बालाजीही म्हणतात.  हा विष्णूचा अवतार आहे. 




          या पर्वतावर कपिलतीर्थ नावाचे सरोवर आहे. कल्याण कट्टा (डोक्यावरचे केश काढण्याची  जागा), स्वामी पुष्करिणी मंदिराजवळ सरोवर आहे. वाराह मंदिर आहे. येथे  वाराहाचे प्रकटीकरण  झाले होते असे समजतात. बालाजीच्या मंदिराचा कलश संपूर्ण सुवर्णाचा असून, भारतातील  श्रीमंत  देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथे श्रीराधा कृष्ण मंदिर, शिव, हनुमान, गणेश इ. देवतांची  मंदिरे  आहेत. आकाशगंगा, पापविनाश, वैकुंठ, पांडव, जांबली, गोगार्भ इ. तीर्थे आहेत. येथे  भगवंताची 'श्रीमूर्ती' हि शंख, गदा, पद्मधारी आहे. हि मूर्ती सात फुट उंचीची आहे. दोन बाजूला श्रीदेवी व  भूदेवीच्या मूर्ती आहेत. श्रीरामानुजाचार्यांचे येथे एक पीठ आहे. येथून जवळच तीरुचानुरला पद्मावती देवीचे मंदिर आहे.