Sunday, 24 April 2011

सोरटीसोमनाथ - बारा जोतीर्लीगापैकी एक आहे. सौराष्टातील सोमनाथ हे आद्य जोतीर्लीग आहे. प्राचीन काळी सर्वत्र समृद्धी होती.  तेव्हा या भागाचे नाव सुराज्य होते. पुढे ते असुरांच्या ताब्यात गेले. मग यादवांनी ते जिंकून घेतले आणि त्यांचे नाव झाले सौराष्ट्र. सोम म्हणजे चंद्र. चंद्राने इथे शिवासाठी तप केले. आणि त्यांना नाथ अश्या नावाने तो हाक मारू लागला. शिव त्याला प्रसन्न झाले तो हा सोमनाथ भक्तीच्या सामर्थ्यावर  शिवाच्या मस्तकावर ज्याला आढळ स्थान प्राप्त झाले तो हा चंद्र. भगवान श्री कृष्णाने आपली अवतार समाप्ती येथे केली म्हणून या क्षेत्राला महत्व आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुढाकाराने मंदिर बांधण्यात आले असून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी येथील सोमनाथाची प्रतिष्ठापना केली आहे. साध्वी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले एक सोमनाथाचे मंदिरही येथे आहे. एका व्यधाने सोडलेला बाण लागून श्रीकृष्णाची  अवतार samapti  झाली. येथे हिरण्य नदी आहे. श्रीकृष्ण आणि श्रीमाध्भगवत्गीता मंदिर आहे.
 त्रिवेणी संगम आहे. हिरण्य, सरस्वती आणि कपिला या नद्या समुद्राला मिळतात तेथे संगमेश्वरचे आणि सूर्याचे मंदिर आहे.








Saturday, 23 April 2011

केदारनाथ


केदारनाथ -बारा ज्योतीर्लीन्गातील एक तीर्थक्षेत्र. समुद्रसपाटीपासून सुमारे १९,००० किलोमीटर उंचीवर हिमालयात हे शिवालय आहे. सत्य उगामध्ये केदार्नामक  राजाने  इथे घोर शिवशंकराची तपस्चर्या केली. त्यावरून या क्षेत्राला केदार नाव पडले. केदारनाथला पाच नद्यांचा संगम आहे. मंदाकिनी  सरस्वती, शिर्गंगा, स्वर्गाद्वारी आणि महोदधी या पाच नद्यामिळून एक प्रवाह वाहतो तो म्हणजे मंदाकिनी. 
 
इथे प्रचंड बर्फ वृष्टी होत असते. केदार हे छोटेसे गाव बर्फात बुडले जाते. तेथील केदारनाथाचे  मंदिर आणि घरे बर्फमय होतात. दिवाळीच्या पाडव्याला केदारनाथाचे मंदिर बंद केले जाते. ते नंतर अक्षयतृतीयेला उघडले जाते. मंदिर सहा महिने बंद असते. तेव्हा तेथील उत्सव मूर्ती उखिमठ येथे नेण्यात येते. केदारनाथाच्या खाली बद्रीनाथाकडे जातांना हे उखिमठ लागते. पांडवांच्या तपस्चर्येने शिवशंकर  प्रसन्न झाले आणि त्यांनी दर्शन दिले. म्हशीच्या पाठीचा भाग केदार येथे जमिनीवर राहिला तेच म्हणजे केदारनाथ स्वयंभू  लिंग त्यामुळे हे लिंग म्हशीच्या पाठीसारखे आहे. शिवलिंगाची पूजा केल्याने पांडव पापमुक्त झाले. तेथे मग पांडवांनी मंदिर बांधले. पुढे आद्य शंकराचार्यांनी त्याचा जीर्नोद्दार केला देवळावर सुवर्न् कलश आहे. तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आहे. देवळामध्ये पांडव आणि द्रोपदी यांच्या प्रतिमा आहे. येथे शिवलिंगाला पाण्याने स्नान घालत नाही त्याला तूप चोळण्याची प्रथा आहे. मंदिराच्या भोवती आठ कुंडे आहेत. येथून जवळच भिराव्झाप नावाचा हिमालयाचा कडा आहे. तेथून उडी टाकून देह समर्पण केला. तर आत्महत्येचे पाप लागत नाही असे महात्यंम आहे. स्वर्गारोहण नावाचा इथे एक मार्ग आहे. पांडव याच मार्गाने देह समाप्तीच्या वेळी गेले. स्वर्ग्रोहण येथे कुंड असून ते तीर्थ आहे. 





























































































































































































































































































जाग्ग्नाठ्पुरी







जाग्ग्नाठ्पुरी:- पूर्व भारतातील सर्वात महत्वाचे तीर्थे क्षेत्र म्हणजे  जाग्ग्नाठ्पुरी. चारी धामापैकी एक धाम . सागराचा संन्निधात वसलेले ओरिसातील हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील मुख मंदिरात श्रीकृष्ण ,सुभद्रा , आणि बलराम यांचा लाकडी ओद्क्यचा हाथ पाय नसलेल्य मूर्तआहे .त मागील कथा अशी आहे कि श्री कृष्णाचा पत्त्राना आकडा द्वारके madhe रोहिणीचा घरी गळा v tani तिला श्री कृष्ण gopi कथा साग्नास सागितले . parantu तिथे सुभद्रा होती. तिला हि कट सुम्जुन्ये म्हणून रोहिणीने सुभद्राला दारापाशी उभें केले v आत कोणालाही यू देऊ नकोस असे सागितले v दर लाऊन घेतले तव्धात तिथें देवर्षी नारद आले v tani रोहोनोला हक मारली. ती बाहेर आली पण तव्धात श्री krushna, subhdra आणि बलराम अदृश्य झाले v orisat nilachal prvtavar gale v tahe aka grib bhktakde rahu  lagle. yathe subhdra आणि बलराम yancha hath pai naslela chandni lakdi murte ahet. aashadh mdhhe ya devanche aathe divas yatra tala jagnathache yatra भरते तला जाग्नाथाचे रथयात्रा म्हणतात. जाग्नाठ्पुरीचा आकार शान्खासारखा असलाने याला शंख स्क्त्र हि म्हणतात मार्कंडेय सरवर , कृष्ण वाट, बलराम साम्मुद्र लोकनाथ हुनुमान बडी, बनपुर, महान्द्र्गिरी, वैगेरे क्षेत्र आहे.





























































 

Saturday, 2 April 2011

काशी

काशी- कांची हे शिवतीर्थ आणि विष्णुतीर्थहि आहे. येथील स्टेशनाचे नाव कांजीवरम असले तरी या शहराचे नाव कांचीपुरम आहे. मद्रासपासून सुमारे १२ कि. मी. वर हे शहर आहे. शिवकांची व विष्णुकांची असे या नगरीचे दोन भाग आहेत.
 
        अयोध्या, मथुरा, द्वारका, हरिद्वार, काशी, उज्जैन आणि 'कांची' या मोक्ष देणाऱ्या सप्तपुर्या     आहेत. येथे सतीचे नख गळून पडले म्हणून या क्षेत्राला शक्तीपीठहि मानतात.  
             
 
 
 
                  नेत्रद्वय महेशस्य काशीकांचीपुरीद्व्यम !
         म्हणजे काशी आणि कांची हे शिवाचे नेत्र आहेत, असे ब्रम्हांडपुराणात म्हटले आहे.   
 
         येथील एकम्बरनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या महाद्वारावरील गोपूर ५८ मीटर उंच आहे आणि येथील सभामंडपाला एक हजार खांब आहेत. येथील शिवलिंग पृथ्वी-तत्वरूप मानतात. शिवकांचीमधील कामाक्षीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. गावात शंकराचार्यांचेहि मंदिर आहे.
 
 
 
 
 
         विष्णुकांचीला वरदराजाचे मंदिर प्रसिद्ध आहे. या कांचीमध्ये १८ विष्णूस्थळे, १०८ शिवस्थळे आणि-१ गणेशस्थळे आहेत. येथील कैलासाचे मंदिर इ. स. ६७४ मध्ये पल्लवराजांनी बांधलेले आहे. 
 
         येथील पिप्पलैथम हे प्राचीन जैन मंदिरही प्रसिद्ध आहे. हि पल्लवांची राजधानी होती. दक्षिणेतील प्रत्येक संत, तसेच पंडित, साहित्यिक यांनी या ठिकाणी वास्तव्य केले.  त्यामुळे हि विद्वानांची नगरी म्हणून मानण्यात येते. बौद्ध व जैन मुनींनीही येथे वास्तव्य केले. येथे विद्यापीठ होते.
 
         सर्वतीर्थ, शिवगंगा, पुष्करिणी, कोटीतीर्थ वगैरे अनेक सरोवर येथे आहे.
 
 
 
 

कन्याकुमारी


कन्याकुमारी- भारताच्या दक्षिणेकडील तीर्थस्थान. पश्चिमसागर, दक्षिणसागर, व बंगालचा उपसागर या  तीनही सागराचा संगम येथे आहे. एकावेळी सूर्यास्त व चंद्रोदय पहावयाचे ठिकाण. ५१ शक्तीपीठापैकी हे देवीचे विशाल मंदिर आहे. 




              त्रिवेणी सागरसंगम स्थानाचे महात्म्य येथे आहे. येथून पुढे समुद्रात विवेकानंद स्मारक आहे. तेथे तीन दिवस विवेकानंदांनी तप केले होते. तेथे त्यांना दिव्या साक्षात्कार झाला होता. तेव्हा देवीचे दर्शन स्वामीजींना झाले होते. त्याचे चरणचिन्ह आजही तेथे आहे. येथे विवेकानंद मंडप,  ध्यानमंडप, श्रीपाद मंडप अशी स्थाने आहेत. कन्याकुमारीहून जवळच शुचीन्द्रम  म्हणून स्थान आहे. 




              शुचीन्द्रम येथे शंकर कन्याकुमारीशी विवाह करण्याकरिता आले होते. ते हे स्थान. येथे शिवलिंग रूपातील त्रिमूर्ती असून त्यावर नागफण्यांची छत्री आहे. त्यामध्ये चंद्राचा सोळा कळा  दाखविल्या जातात. येथेही स्तंभावर स्वर उमटतात. हे स्वर तंबोरा, सतार, जलतरंगचे  आहेत.  



              येथून पुढे नागर कोइल येथे नागेश्वराचे मंदिर आहे. तीरुविहार येथे शेषशायी भगवंताची  मूर्ती आहे. त्यानंतर पपनाराम येथे नीलकंठ, नियातेकरा येथे श्रीकृष्ण, कुमारकोइल येथे कार्तिक स्वामी यांची मंदिरे आहेत. जवळच त्रिवेंद्रम शहर आहे. तेथे पद्मनाभ भगवंताचे मंदिर असून मुळचे नाव तिरुअनन्तपुरम असे आहे. तेथे मत्स्यतीर्थ, कोलत्तूर, व जनार्दन हि तीर्थस्थाने आहेत.